
कृषि उत्पन्न बाजार समिती, कळमेश्वर
1935 साली शेतकऱ्यांचे प्रतिनिधीत्व मिळाले. याच वर्षी तालुका सहकारी खरेदी विक्रीची स्थापना झाली आणि शेतकऱ्यांना प्रतिनिधी नेतृत्व पुढे येवू लागले सहकार महर्षी बाबासाहेब केदार यांच्या पुढाकाराने कळमेश्वर कृषि उत्पन्न बाजार समितीची दिनांक 02/11/1962 ला स्थापन झाली आहे. महाराष्ट्र राज्य कृषि उत्पन्न खरेदी विक्री (विकास व विनियमन) 1963 नुसार दि. 26/09/1969 ला सहकार महर्षी बाबासाहेब केदार मार्गदर्शनात प्रत्यक्ष कामकाजास सुरुवात झालेली असुन बाजार समितीला 63 वर्षे झाले आहे समितीला पहीले सभापती महाविरप्रसाद आमगावकर शेतक-यांचे प्रतिनीधी यांनी संत्रा या मुख्य पिकाला समितीच्या नियमनात आणले. व तेथुनच समितीची उत्पन्नाची सुरवात झाली. नंतर चंद्रशेखर देशमुख , माधवराव सुके, सुधाकरराव धोटे(कार्य. सभापती), रमेशराव फुलारे , अरविंदजी रामावत, अनिलजी डांगोरे, गुणवंतराव नागपुरे, नंतर सन 2015 पासुन ते आतपर्यत श्री. बाबाराव क. पाटील हे सभापती पदावर कार्य करीत आहे. समितीने नियमनाखाली तांदुळ, गहु, ज्वारी, मुंग, चना, उडीद, बाजरा, सोयाबीन, जवस, तीळ, भुईमुंग, शेंगा, एरंडी, अंबाडी, धान, कापूस, मिरची, चिंच, सरकी, संत्रा, आंबा, मोसंबी, केळी, सेफ, द्राक्षे व इतर फळे, बटाटे, कांदा, लसुन, अद्रक, सुरन टोमँटो, कोकम, पालेभाज्या आहेत. सर्व मुख्य व उपबाजारात नियमीत शेतीमाल खरेदी-विक्रीचे व्यवहार सूरु झाले
सर्व माहितीसाठी....